काही शब्द असे असतात|
जे हृदयाला स्पर्श करतात||
शब्द चांगले असोत की वाईट|
कधीच बोलायचे नसतात घाईत||
बोलणाऱ्यांच्या जिभेला हाड नसते|
ऐकणाऱ्यांचे मात्र सारे लक्षच तिकडे असते||
शब्द हेच शस्त्र अन् अस्त्र असतात|
उगाच फुकट बोलायचे नसतात||
आपले शब्द नेहमीच असावेत मवाळ|
कृती मात्र असावी जहाल||
बोलणाऱ्यांचे शब्द आणि ऐकणाऱ्यांचे कान|
दोघेही करीत असतात सारखीच घाण||
करू नये शब्दांचा वापर शस्त्राप्रमाणे|
नाहीतर अवस्था होईल श्वानाप्रमाणे||
"ना घर का,ना घाट का" हेच जीवन नसते|
तर आपल्या मधुर वाणीने ते फुलवायचे असते||
शब्द हे माणसाला आकाशाला भिडवतात|
आणि कधी कधी हेच तळागाळात नेतात||
अनेक अक्षरांचा मिळून बनत असतो शब्द|
त्याचा उपयोग करावा विचारबद्ध||
शब्दांशिवाय अपूर्ण आहे संवाद|
ह्यांच्या चुकीच्या वापराने होतात वादावाद||
शब्द हीच माणसाची असते खरी संपत्ती|
कधी-कधी हीच निर्माण करते आपत्ती
नवनाथ ठोंबरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा